समाज प्रबोधनाचा वसा घेतलेला अवलिया ........
डॉ संजय सोनवणे यांची पांढरे कोड आजारावर उल्लेखनीय जनजागृती..
गोरया रंगाचे आकर्षण तर
सर्वांनाच आसते , पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या
चेहऱ्यावर लहान मोठ्ठा पांढरा डाग दिसु
लागतो त्यावेळी मात्र आपण त्याला
टाळतो , त्याचे वैगुण्य त्याला दाखवतो कळत
न कळत आपण त्याला दुखावतो , खरे तर ती व्यक्ती आधीच काळजीत आणि दुखत आसते पण आपण
चिचार न करत दुखावत आसतो तो पहिलाच दुखाने खचलेला आसतो , आशा व्यक्तींना
खरे तर मानसिक सामाजिक आधाराची गरज असते पण आसे होत नाही त्यांना आधार
देण्याऐवजी दुखावले जाते हि खेदाची बाब आहे , कृपा करून आसे करू नका.
जागतिक त्वचारोग समिती ( World Vitiligo
Foudation ) यांनी २५ जून हा
जागतिक कोड दिन म्हणून मायकल जाक्सन च्या स्मरणार्थ पाळावयाचा ठरवले आहे. या दिवशी
विविध सामाजिक संघटना या दिवशी विविध जनजागृती कोड विषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज
प्रबोधन करण्यासाठी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणून पाळावयाचे ठरवले आहे .या दिवशी विविध जनजागृतीपर योजना
कार्यक्रम राबवतात किबहूना त्यांचे अविरत
कार्यक्रम चालूच असतात कोड , पांढरेदाग या नावाने याला वितीलीगो ( cvitiligovitiligo
) ल्युकोडर्मा (LEUCODERMA ) या नावाने वैद्यकशास्त्रात
संबोधले जाते तसा हा काही मोठ्ठा शाररीक आजार नाही पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या
आहे . विशेत: मुलीमध्ये त्यायातच उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये सुद्धा विवाह
जुळण्यास फार मोठ्ठी अडचण आहे . या शिवाय ज्या व्यक्तींना पांढरेडाग कोड या
आजाराचा त्रास आहे त्या समाजापासून उपेक्षित राहतात या लोकांमध्ये एकेलकोंडेपणा ,
शापित आयुष्य व्यतीत करण्याची वेळ येते .
कोडावर , पांढरे दगगावर कुठलेही औषध नाही , हा दैवी कोप आहे वगैरे समजुतही आपणाकडे रूढ आहेत .
या सर्व प्रश्ननाची उकल
करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या आणि अशा अनेक प्रकारच्या PEASHNANCHI
उत्तरे आमच्याकडे आहेत , हा लेख तुम्हाला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल तसेच
रुग्णावर सहज सुरक्षित आणि परिणामकारक इलाज कसे होऊ शकतील हे आपणास सांगेल इतकेच नाही
तर याचा हेतू आहे रुग्न्नाना निरोगी कार्यशील
जीवन जगता येणे शक्य आहे असा विश्वास देण्याचा तुम्ही पांढरे डागावर सहज विजय मिळवू शकता तुम्हाला वाटते त्याहून हि अधिक ते
सोप्पे आहे .
वैद्यकीयदृष्ट्या कोड हा
काही आजार नाही , कारण या पासून कुठही त्रास होत नाही किव्हा जीवितालाही धोका
नाही तरी सुद्धा कोड हा भयंकर सामाजिक
आजार आहे . पांढरे डाग असलेल्या मुला – मुलींचे लग्न होणे कित्ती अवघड आहे त्या कुटुंबालाच
ज्ञात आसते . हे त्या कुटुंबावर कलंक लावला जातो ,समाजात त्याची अवहेलना केली
जाते, ज्या व्यक्तीला कोड आहे त्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे , आपणास
काहीतरी असाध्य भयानक आजार झाला आहे या न्युन्गांडत तो वावरत आसतो . किंबहुना तो समाज्पासून दूर राहण्याचा प्रयत्न तो करत आसतो .त्याचा
आत्म विश्वास पूर्णपणे ढासळलेला आसतो .हे सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व
करून दाखवले तर समाज त्यांना नक्कीच मानवंदना देतो , अशी अनेक उदाहरणे आहेत .
उदा . मायकल जाक्सन ,एकनाथ सोलकर याने तर
विश्वविक्रम घडून दाखवला
मुलींच्या बाबतीत पांढरे
डागांचा कोडचा त्रास जास्त जाणवतो अशा मुलींचे लग्न जमणे खुपच आवधड जाते .
काहीवेळा तर पूर्वजांनी केलेल्या पापामुळे या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचार समाजात केला
जातो .अशा अनेक मुलींची आयुष्यहि बरबाद
झाल्याची उदाहरणे समाजात आहेत .बर्याच
वेळा उतारवयात हि लक्षणे दिसू लागतात
परंतु योग्य उपचार घेताल्रे कि हा आजार असाध्य नाही .
मंगळी मुलगी तशीच कोडाची
मुलगी कुटुंबाला शाप ? असा आक्रोश ह्कारुन्ही काही उपयोग नाही. मांत्रिक तंत्रीककडे
जाऊनही काही फारसा उपयोग नाही . ज्या व्यक्तींना कोड आहेत त्या व्यक्तींना व्यक्ती
शापित आहेत किव्हा काही वेगळ्या आहेत असा समज करून घेऊ नये . या आजाराने शाररीक ,
बौद्धिक , मानसिक क्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही त्याची बुद्धीमत्ता हि अन्य
व्यक्तीप्रमाणेच आसते .भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर आजार आहे हा गैरसमज ,
आंधश्रधा रूढी परंपरेतून कायम राहिली
आहे.हि बाब दुर्दैवी आहे अगदी सुशिक्षित
माणसेही गंडेदोरे आणि अंगारा-
धुपार्याच्या मार्ग कोड निवारण्यासाठी स्वीकारतात
हे मी पाहिले आहे. हे योग्य नाही . कोड असणाऱ्या व्यक्तीनी समाजात अनेक
उतुंग यशाची शिकरे गाठली आहेत हे लक्षात
घेऊन आपण सार्वजन मिळून या कोडची कीड दूर करूयात ....
अगदी सोप्प्या
भाषेत सांगायचे ठरले तर शरीरात असणारा रंग कमी झाल्याने त्वचा पांढरी दिसू लागते यालाच पांढरे डाग म्हणतात .
त्वचेमध्ये
असणार्या मेलानिन नावाच्या रंग
द्रव्याच्या प्रमाणामुळे शरीरास , त्वचेला काळा , सावळा, निमगोरा , गोरा
रंग येतो. तो रंग तयार करणाऱ्या पेशी
ज्यावेळी अकार्यक्षम होतात .
व्यवस्थित कार्य करत नाहीत . आथवा नष्ट
होऊ लागतात त्यावेळी त्वचा पांढरट होते आणि पांढरे डाग दिसू लागतात
कोडचे कारण :-
कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो , हा काही देव
दैवतांचा शाप नाही कि भूतबाधाही नाही
.......
याला शास्त्रीय कारण एवढेच सांगा येईल कि मेलानिन हा रंग
तयार करणाऱ्या मेलानोसाईट पेशींच्या विरोधात अंटी मेलानोसाईट ( Anti
Melanocyte ) प्रतीद्रव्य तयार होतात आणि हि
प्रतिद्रव्य मेलानीन निष्क्रीय
करतात व मेलानीन तयार होत नाही हि
प्रतिद्रव्य का तयार होतात हा
संशोधनाचा विषय आहे आणि त्याविषयी जगभरात संशोधन चालु आहे ... अधिक माहिती आणि
संपर्कासाठी
डॉ. संजय सोनवणे
आनंद हॉस्पिटल अंड रिसर्च सेंटर घोडेगाव
ता:- नेवासा जि :- अहमदनगर महाराष्ट्र
मोबाईल आणि whatsapp
९७६२३७८४९२
डॉक्टरांना या विषयावरील व सामाजिक केलेल्या
कार्याचा गौरव म्हणून त्यांची दिल्लीत ``
चिकित्सक रत्न ``या पुरस्कारासाठी निवड २००४
साली झाली.
तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने २४ फेब २००५ रोजी राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले .
त्याच प्रमाणे १७ सेप्ट .
२००६ रोजी शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र
मंडळ अ. नगर यांचे वतीने राज्यस्तरीय
समाजभुषण पुरस्कारांनी संम्मानीत करण्यात आले .
त्याच
प्रमाणे युवा शक्ती सामाजिक संस्था नासिक , यांचे
वतीने २० में २००८ रोजी , उप् जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड ,आ.
अनिल ढिकले,आदि.च्या उपस्थितीत नासिक येथे
समाज प्रबोधन २००८ पुरस्कार देण्यात आला .
तसेच
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
अहमदनगर . यांचे वतीने शिर्डी येथे माननिय गृहमंत्री श्री, आर.आर.पाटील
साहेब यांचे हस्ते कार्यगौरव पुरस्कार
प्रदान करण्यात आला .
तसेच
आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा ,
माजी शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके यांचे हस्ते
संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार ,
M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला .
त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार
संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री
. विक्रमसिंह पाचपुते मा.श्री. विजयकुमार
पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) ,
मा.श्री.संदीप कोकडे ( तहसीलदार कर्जत ) मा .शिरसाठ ( आद्यक्ष
ग्रामीण पत्रकार संघ , महाराष्ट्र )
आदी. उपस्थित होते.
दहा वर्षापासुन सामाजीक,शैक्षणीक कार्यात सकारात्मक भुमीका
स्विकारत शिक्षण व सामाजीक बांधिलकी जपणार्या सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव
बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात
येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना
प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत
असतांना, पांढरे डाग चिकूनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा
वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी
चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान
म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय.